आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
दहिवडी:माण पंचायत समिती आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्यावतीने माण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये स्वच्छ माझे अंगण स्पर्धा राबवण्यात येणार आहे. अभियान कालावधी दि. 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत गावातील सर्व कुटुंबांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माण चे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी केले आहे.
स्वच्छ भारत अभियानाला गती आणून देणे, गावातील साथीचे रोगांवर उपाययोजना करणे, गावातील ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुटुंबांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. जास्त गुण मिळवणाऱ्या कुटुंबांना प्रशस्त पत्र सन्मानचिन्हा देऊन ग्रामपंचायत स्तरावर गौरवण्यात येणार आहे. यासाठी गावातील गणेशोत्सव मंडळे, युवा मंडळातील युवक, गावामधील तरुण मुले, मुली, महिला आणि ग्रामस्थांनी हे अभियान यशस्वीपणे राबवण्याकरतउत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रदीप शेंडगे, यांनी केले
आहे.
या स्पर्धेचे मार्गदर्शन सोमनाथ बर्गेआणि विकास शिंदे यांनी केले आहे.