आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगली शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेरी नाल्याचा गंभीर प्रश्न सभागृहात उपस्थित केला.
सांगलीकरांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी संबंधित या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी थेट सरकारचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
मात्र, एक प्रश्न प्रत्येक सांगलीकराच्या मनात आहे — सांगली शहराचे स्थानिक आमदार या प्रश्नावर आजपर्यंत ठामपणे आवाज का उठवत नाहीत?
शेरी नाल्याच्या दुर्गंधीमुळे आणि प्रदूषणामुळे हजारो नागरिक त्रस्त आहेत. हा प्रश्न केवळ राजकारणाचा नसून नागरिकांच्या आरोग्याचा आणि भवितव्याचा आहे.
आज दुसऱ्या मतदारसंघातील आमदाराने हा प्रश्न विधानसभेत मांडला, ही बाब कौतुकास्पद असली तरी सांगलीच्या लोकप्रतिनिधींनीही आता या प्रश्नावर सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे.
✅ शेरी नाल्याला कायमस्वरूपी तोडगा द्या!
✅ सांगलीकरांना दुर्गंधी आणि प्रदूषणातून मुक्त करा!
✅ सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पाठपुरावा करा!
शेरी नाल्याचा प्रश्न विधानसभेत मांडल्याबद्दल आमदार विश्वजीत कदम यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
— मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली