**नागरिकांनी आपत्ती काळात प्रशासनाने दिलेल्या सूचना ,निर्देश यांचे पालन करून सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये ,शांतता राखून सहकार्य करावे ---
मा. सत्यम गांधी आयुक्त भा प्र से
आज मगलधाम मनपा कार्यालय सांगली येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या मध्ये मा सत्यम गांधी आयुक्त ,पोलीस उप अधीक्षकआर विमला अति आयुक्त रविकांत अडसूळ ,उप आयुक्त शिल्पा दरेकर, स्मूर्ती पाटील विजया यादव वैभव साबळे , गृह उप अधीक्षक दादासो चुडापा इत्यादी उपस्थितीत होते .
या मध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वर चर्चा करण्यात आली आहे,
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये.
नागरिकांनी कोणताही संदेश व्हाट्सअप्प वर व अन्य सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी समाज मध्ये असंतोष निर्माण होईल,गैर समज निर्माण होईल असे टाकू नये,
पोलीस यंत्रणा सर्व बाबीवर लक्ष केंद्रित करून असणार आहे,
नागरिकांनी आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर निदर्शनास आल्या नंतर लगेच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून माहिती देण्याची आहे ,
कोणत्याही परिस्थितीत दोन समाजामध्ये द्वेष निर्माण होऊन,अशी चुकीची माहिती प्रसारित ,प्रसिद्ध करू नये ,
बोर्ड फलक ,बॅनर ,डिजिटल परवानगी घेतल्या शिवाय प्रसिध्द करू नये ,कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी परवानगी घेऊनच प्रसिद्धी करावी असे स्पष्टपणे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना,
आदेश ,निर्देश यांचे काळजीपूर्वक पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे अहवान मा सत्यम गांधी आयुक्त यांनी केले आहे.