लेखन संस्कृतीला चालना देण्यासाठी श्री शारदा भवन हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 08/08/2026 7:15 PM

अर्धापूर  :- श्री शारदा भवन हायस्कूल, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये लेखनकौशल्य, वाचनसंस्कृती, विचारशक्ती आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी या उद्देशाने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य, साहित्यसंपदा, सामाजिक समतेचा संदेश आणि परिवर्तनवादी विचार यांवर अभ्यासपूर्ण निबंध सादर केले.
     स्पर्धेतील निबंधांचे परीक्षण आत्माराम कदम व ए. ए. राऊतवाड व आर.एम.खडकीकर, यांनी वस्तुनिष्ठ निकषांवर केले. विषयाची मांडणी, भाषाशैली, विचारांची सुसंगती, अभिव्यक्ती आणि शुद्धलेखन या निकषांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली.
   स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला:
- प्रथम क्रमांक: कु. योगिता नरोबा आसेगावकर
- द्वितीय क्रमांक: कु. प्रतिक्षा काशिनाथ मदने
- तृतीय क्रमांक: कु. शर्वरी नंदकुमार लासिनकर
यशस्वी विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री अरूण कल्याणकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
     बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री अरूण कल्याणकर होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित वाचन, चिंतन आणि लेखनाची सवय जोपासावी, साहित्यिकांच्या विचारांचा अभ्यास करून सामाजिक बांधिलकीची जाणीव विकसित करावी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समता, शिक्षण आणि मानवतेच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारावा, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव मदने यांनी करून स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रकाश कदम यांनी केले, तर अनिल सवडतकर व आर. एस. खांडरे यांनी आभार प्रदर्शन केले.
   या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखनकौशल्य, चिकित्सक विचारसरणी, अभिव्यक्ती क्षमता आणि साहित्याविषयीची आवड वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत झाली.
    या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जेष्ठ शिक्षक एस. एस. डोईबळे, नागेश बोचकरी, बी. एम. मोकमपल्ले, आर. बी. लोकरे, एस. पी. भालेराव, पी. एस. तेलंग, डी. बी. पंडीत, व्ही. डी. काळे, एन. पी. केरूरकर, पी. डब्ल्यू. लोखंडे आणि व्ही. के. कवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि यशस्वी वातावरणात पार पडला.
   या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले असून, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, लेखनकौशल्य आणि सामाजिक भान विकसित होण्यास मोठी प्रेरणा मिळते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या