नांदेड :- नांदेड जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार व कृषि आयुक्तालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली 29 एप्रिल रोजी धरती माता बचाव अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय धरती माता बचाव निगरणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीत रसायनिक खतांच्या अतिरिक्त वापर आणि बिगर कृषि कारणासाठी होणाऱ्या रसायनिक खत वापरावर लक्ष ठेण्याकरिता ग्रामस्तरावरील ग्राम कृषि विकास/धरती माता बचाव निगरणी समिती मार्फत गाव पातळीवर कळविण्यात आले आहे. तालुका/उपविभागस्तरावर धरती माता बचाव निगरणी समिती स्थापन करुन प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर नियमीत ग्रामसभा होत आहेत किंवा नाही याच्यावर लक्ष ठेवेल.
रासायनीक खतांचा वापर वाढत असल्याचे दिसुन आले आहे, याचे एक कारण म्हणजे शेतकऱ्यांमध्ये खतांच्या काटकसरीने वापराबाबत जागरुकता नसणे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक व्यापक बहूस्तरीय यंत्रण प्रस्तावीत आहे. या यंत्रणेला धरती माता बचाव अभियान ज्यामध्ये गाव, उपविभाग आणि जिल्हा समित्या असतील त्याव्दारे योजनेची प्रभावी जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.
जिल्ह्यामध्ये धरती माता बचाव अभियान अंतर्गत बागायत क्षेत्र व खताचा जास्तीचा वापर असणाऱ्या ग्रामपंचायत स्तरावर 100 गावांची निवड करण्यात आलेली असुन सदर निवडलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतमार्फत धरतीमाता बचाव निगराणी समितीची बैठक घेऊन रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी व बिगर कृषि कामासाठी वापर न होण्याकरिता कृषि विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ व समिती सदस्यद्वारे गावपातळीवर प्रचार व प्रसिद्धी करणे. रासायनिक खताचा जास्तीचा वापरावर लक्ष ठेवून असा प्रकार होत असल्यास तो वेळीच तालुका व जिल्हापातळीवरील संबधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.आर. कळसाईत, कृषि विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, डॉ. देविकांत देशमुख, डॉ. प्रविण चव्हाण प्रमुख शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, सचिन कपाळे मोहीम अधिकारी, अमोल पेकम जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, बजरंग कापसे आर. सी. एफ. कंपनी जिल्हा प्रतीनिधी, अतुल लहाने कोरेामंडल ली. खत कंपनी जिल्हा प्रतिनीधी उपस्थित होते.