सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगलीतील प्रभाग क्रमांक 15. मधील डॉ. पी आर पाटील रोड, कत्तलखान्याजवळ पाणीपुरवठा विभागाने . पाण्याचा वास येतो म्हणून दोन महिने झाले जीवघेणा खड्डा पाडलाय. परंतु दोन महिने उलटूनही तो तसाच असून, तो नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. नागरिकांनी या विरोधात वारंवार पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.यामध्ये केवळ आणि केवळ पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा दिसून येतोय.
पाणीपुरवठा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा पाणीपुरवठा विभागासमोर लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहोत.
*मनोज भिसे--अध्यक्ष लोकहित मंच सांगली*