* सांगली प्रतिनिधी
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांकडे महापालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. कारण महापालिका क्षेत्रात अनेक समस्या नागरिकांना भेडसावत असून पावसाळ्यामध्ये अनेक नागरिकांच्या घरात गटारांचे पाणी शिरत असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत.
प्रभाग क्रमांक आठ मधील आनंदनगर गल्ली नंबर तीन मध्ये नालेसफाईचा ढिसाळ कारभार दिसून येत असून या पावसामुळे इथल्या नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत.
या ठिकाणी नालेसफाई व्यवस्थितपणे झाली नसून कुपवाड शहरातील सर्व सांडपाणी या आनंदनगर मधील गल्ली नंबर तीन मधील नागरिकांच्या घरात शिरत आहे. आजही तासभर पडलेल्या पावसामुळे या ठिकाणच्या घरामध्ये हे सांडपाणी शिरल्याने इथले नागरिक आक्रमक झाले आहेत. या प्रभाग क्रमांक आठ मधील नगरसेवक या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे,दिसून येत आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीकडेही दुर्लक्ष करत आहेत. शिवाय महापालिका प्रशासनातील अधिकारीही याकडे डोळेझाक आहेत. असा आरोप इथल्या नागरिकांनी केला आहे.
इतर ठिकाणी जशा नागरि सुविधा दिल्या जातात तश्या आम्हालाही मिळाव्यात कारण आम्हीही महापालिका निवडणुकीत मतदान करतो, महापालिकेचे विविध कर भरतो. त्यामुळे आम्हालाही विविध सोयी सुविधा मिळाव्यात. अन्यथा या ठिकाणी येणारे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी आयुक्तांच्या केबिनमध्ये ओतू असा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्यासह इथल्या स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
आज या ठिकाणी शिरल्यानंतर लोकांनी महानगरपालिकेविरुद्ध आवाज उठवत तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी समीर जमादार, दत्ताजीराव माने, दर्शन चौगुले, सचिन ऐवळे, धनाजी राठोड, विठ्ठल हेगडे, मज्जिद शेख, अश्विनी होळकर, रुक्मिणी माने, विठ्ठल हेगडे, नसीम खान, हर्षद चौधरी, लक्ष्मण कांबळे, संजय शिंगाडे, राजू सावंत, आबा गोसावी, दादा सोहेल मोरे, दिलीप सुर्वे, योगेश गुरव, राम सातगिरे,चंद्राबाई इंगळेश्वर, पार्वती वसमने, कृष्णा चव्हाण, बाळाबाई चव्हाण, कोमल गेजगे, जना हेगडे, सलमा जमादार, सुवर्णा गोसावी, वंदना ऐवळे आधी नागरिक उपस्थित होते.