मंगळवार दिनांक 3 मे 2025 वार्ड क्रमांक 8 आनंदनगर येथील नागरिकांचा व महावितरणचा अधिकाऱ्यांच्या संघर्ष आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही नागरिकांना सर्व स्मार्ट मीटर चे तोटे समजून सांगितले नागरिक फार आक्रमक झाले मग
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले पोलिसांना पण सर्व अधिकार 2003 चा कायदा कोणते मीटर असावे हा ग्राहकाचा अधिकार आहे त्यावेळी पोलिसांनी परस्पर नागरिकांच्या सहमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसू नका असे सांगितले
मग साधारण 25 ते 26 ठिकाणी बसवलेली स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवण्यात आले
सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ पर्यंत सदरचा प्रकार चालू होता
मा. पालकमंत्री असतील मा.जिल्हाधिकारी असतील तसेच आमदार खासदार या सर्वांना आम्ही पत्रे पाठवली आहेत यांनी याबाबत तात्काळ तोडगा काढावा अन्यथा फार मोठ्या प्रमाणात कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी जबाबदार राहणार आहेत
मनोज लांडगे, शब्बीर शेख, बिरूदेव म्हारगुडे, संदीप मोरे, नामदेव ओलेकर काका, अशोक शिंदे, गजानन तिरमारे, गजानन बिसले, समाधान टकले व महिला, आनंदनगर मधील सर्व नागरीक उपस्थित होते.
सर्वपक्षीय कृती समिती
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
सतीश साखळकर, उमेश देशमुख, शंभूराज काटकर, आसिफ बावा, गजानन साळुंखे,रुपेश मोकाशी, महेश खराडे, मयूर बांगर, अवधूत गवळी, रज्जाक नाईक, युसुफ उर्फ लालू मिस्त्री,