कुपवाड मधील आहिल्यानगर येथे राहणारे जवान रविंद्र नरळे यांना पश्चिम बंगाल येथे सेवा बजावताना वीर मरण आले. शांतीनिकेतन सांगली येथे १० वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर ते २००५ साली आर्मीमध्ये भरती झाले होते.
जवान रविंद्र नरळे हे आर्मी मेडिकल कोअर मिलटरी हॉस्पिटल पनागड पश्चिम बंगाल येथे नाईक या पदावर सेवा बजावत होते. शनीवारीच त्यांचे आईशी बोलणे झाले होते. लवकरच सुट्टी काढून येईन असे आश्वासनही दिले होते पण सेवा बजावत असतानाच त्यांना वीरमरण आले.