राजकारण, प्रेम आणि युद्धात सर्व काही"माफ"असते....!!!!

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/04/2024 10:51 AM

राजकारणात प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते असे म्हटले जाते 
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे अखंड देशभरात वाहत आहे त्याच पद्धतीने आपल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा देशभरात गाजताना दिसत आहे 
त्याचे कारण पण तसेच आहे महाविकास आघाडीची तिकिटाची लांबलेली प्रक्रिया विशाल पाटील यांची झालेली बंडखोरी संजय काका यांच्या हॅट्रिक ची तयारी आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी तसेच इतर वेळी कुठेही सांगली जिल्ह्यात सक्रिय नसणारे प्रकाश अण्णा शेंडगे यांची उमेदवारी त्याच पद्धतीने चळवळीत काम करणारे स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे यांनी त्यांच्या कार्यासाठी उमेदवारी ठेवलेली आहे का अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांचे चिन्ह गोठवण्यासाठी उमेदवारी ठेवलेली आहे असे बरेचसे प्रश्न या निमित्ताने चर्चेत येत आहेत तसेच लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्याबाबत कोणाचेही दुमत नाही मात्र सध्या सर्वच मतदार संघांमध्ये पंधरा-वीस उमेदवार उभे राहिलेले आहेत असं सर्वसाधारण दिसतं आमच्या माहितीप्रमाणे 650 लहान मोठी गावे वाड्या वस्त्या सांगली लोकसभा मतदारसंघात आहेत आणि किमान 20 लाखाच्या पुढे मतदार आहे या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली यंत्रणा आहे का याचा सारासार कुणीही विचार केलेला दिसत नाही असो 
सांगली जिल्ह्यातील राजकारण हे कोणत्याही पक्षाला धरून नसते तर पक्ष हे जेवणाच्या ताटातील लोणच्या प्रमाणे वापरण्याचा प्रकार वारंवार इतिहासापासून दिसून आलेला आहे सांगली जिल्ह्यातील राजकारण राजारामबापू गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील वसंतदादा घराण्याचे स्वर्गीय मदन भाऊ पाटील असतील व आत्ताचे विशाल दादा पाटील असतील यांच्या गटाभोवतीस फिरत असतं आणि सोयीनुसार लोकसभा असेल विधानसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील या दोन घराण्याच्या भोवतीच फिरत असतं हा आज वरचा इतिहास आहे 
राजकारणात कोण कोणाला सोप्या पद्धतीने पुढे जाऊन देत नसतं मात्र सांगली लोकसभा निवडणुकीत 2019 ला काँग्रेसचे तिकीट का गोठवण्यात आलं हे आजपर्यंत सर्वसामान्य मतदाराला कळलेले नाही तसेच 2019 च्या निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी घेऊन जोरदार निवडणूक लढवली आणि नंतर ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि आमदार झाले 
काही जाणकार राजकारणी लोकांना माहीत होते गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांना निवडून आणण्यासाठीच होती हे सर्वसामान्य मतदारांना निकालानंतर कळाले 
सध्या सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात जागृती झालेली दिसत आहे काही उमेदवारी संजय काका पाटील यांना सोपी जावी निवडणूक म्हणून म्हणून देण्यात आलेले आहेत अथवा भाजप विरोधी मतदान कसे विभागले जाईल याची सुद्धा व्हिव रचना करण्यात आलेली आहे असं राजकारणात हे सगळं चालायचं मात्र चालू निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांचे नाव त्यांच्या अल्फाबेट प्रमाणे खालीच येणार होते मात्र ते कसे अडगळीत जाईल त्यांनी एका विशिष्ट चिन्हाच्या साठी अपक्ष चा अर्ज प्रथम भरून प्रथम क्लेम लावण्यासाठी केलेली उपाययोजना षड्यंत्राच्या राजकारणामुळे मागे पडलेली दिसत आहे एखाद्या मतदारसंघांमध्ये अथवा एखाद्या उमेदवाराला कशा कशा पद्धतीने अडचणीत आणता येईल याची पुरेपूर व्यवस्था राजकीय जाणकार करताना दिसत आहेत हे सुद्धा सर्वसामान्य मतदारांना कळलेले आहे आता बंडखोरी झाल्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम असतील विक्रम सावंत असतील अथवा पृथ्वीराज बाबा पाटील असतील यांची मात्र कसोटी लागणार आहे कालच दैनिक जनप्रवासचे संपादक भोकरे साहेब यांनी 1985 सालचा किस्सा सांगून स्वर्गीय पतंगराव कदम यांना अपक्ष स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी निवडून आणलेला प्रसंग सांगून विश्वजित कदम साहेबांनी पहिरा फेडण्याची वेळ आलेले असं सुचित केला आहे 
पैलवान चंद्रहार पाटील यांची सुद्धा या निवडणुकीत कसोटी लागणार आहे सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक असतील मग ते आमचे बजरंग भाऊ पाटील असतील शंभूराज काटकर असतील आपल्या नेत्यावरील व पक्षावरील निष्ठा अबाधित ठेवून प्रामाणिकपणाने पक्ष आदेश म्हणून काम करताना दिसत आहेत त्यांना कितपत यश येईल ते येणारा काळ ठरवेल 
असो आम्हाला जे दिसते कळते त्या पद्धतीने काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कोणाला आवडेल अथवा नाही आवडेल पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील असतील अपक्ष बंडखोर उमेदवार विशाल दादा पाटील असतील चंद्रहार पाटील असतील व अन्य अपक्ष उमेदवार यांना सर्वांना शुभेच्छा....

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या