जिल्ह्यातील रिक्षाचालकांच्या न्याय हक्कांकरिता मा. आसिफ भाई बावा व मा. रामभाऊ पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी रिक्षा युनियनची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. स्थापनेपासूनच राष्ट्रवादी रिक्षा युनियनच्या सल्लागारपदी माझी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु त्याबाबतचे पत्र आज युनियनच्या बैठकीमध्ये स्वीकारले.
या बैठकीत रिक्षा चालकांच्या विविध समस्यांसाठी कायदेशीर मागण्या कश्या पध्दतीने कराव्यात व कामकाजाची दिशा कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले.
सर्व चर्चेनंतर युनियन बैठकीत पुढील कामकाजाचा आराखडा करण्यात आला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मा. आसिफ भाई बावा, जिल्हाध्यक्ष मा. रामभाऊ पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष मा. अजित पाटील, जिल्हा सचिव मा. साजिद आत्तार, जिल्हा उपाध्यक्ष मा. नितीन वाघमारे, मा. चंदन केंगार, जिल्हा खजिनदार सलिम कुरणे, जिल्हा सदस्य अमित घाडगे,राजू म्हेतर, युवराज शिंदे व सदस्य उपस्थित होते.
युनियन चा सल्लागार म्हणून रिक्षाचालकांच्या कायदेशीर हक्काबाबत सक्रियपणे कार्यरत राहीन.