(सातारा प्रतिनिधी) विजय जगदाळे
दहिवडी (ता. माण )दि.26जुलै 2021रोजी पंचायत समिती माण बिडीओ श्री सर्जेराव पाटील यांचे विरोधात जिल्हा परिषद सातारा कार्यालयात विविध तक्रारी लेखी दाखल झाल्या कारण कि महाशय बिडीओ साहेब कर्तव्यात कसूर, पदाचा गैर वापर म्हणजे, कार्यालयात प्राप्त लेखी तक्रार, किंवा चौकशी, त्या मध्ये सर्व सामान्य नागरिकांची समस्या किंवा कोणत्या ग्रामसेवकां विरुद्ध तक्रार तसेच कोणत्या ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार किंवा महाराष्ट्र शासन निर्णय दि.5/12/2016 चे सर्रास उल्लंघन झाले असून सुद्धा श्री सर्जेराव पाटील बिडीओ मात्र "मांजर झोपेत का व कशा साठी "असा गंभीर प्रश्न माण दुष्काळी तालुक्यातील सर्व सामान्य गरीब जनतेला विचार करण्या सारखा प्रश्न पडलेला आहे, त्या मध्ये कोणी नागरिक, पत्रकार, किंवा कोणत्या सामाजिक संघटनेचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता माण तालुक्यातील ग्रामपंचायत मधील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराची लेखी किंवा तोंडी तक्रार करावयास प्रत्यक्ष गेले असता तक्रार यांना वेठीस धरणे, त्यांचीच उलट सुलट चौकशी करणे कोणतीही प्रकणाची किंवा लेखी तक्रारीची चौकशी न करता उद्धट पणे बोलणे कार्यालयात प्राप्त, लेखी तक्रारी, निवेदन, माहिती अधिकार यांची चौकशी एक -एक महिना लांबविणे किंवा दिरंगाई करणे असे नाना तर्हेचे प्रकार माण बिडीओ यांचे साठी काही नवखे नाहीत असे वरील प्रकारवरून स्पष्ट होत आहे, म्हणून माण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री रविंद्र लाला जगताप "सिटीझन जस्टीस प्रेस कौन्सीलऑफ महाराष्ट्रचे पश्चिम म. अध्यक्ष "यांनी पुन्हा दि.15/9/2021रोजी मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी "सामान्य प्रशासन विभाग "जिल्हा परिषद सातारा यांचेकडे मागणी केली आहे कि मा. गट विकास अधिकारी वर्ग -1"सर्जेराव पाटील "पंचायत समिती माण यांचे विरोधात *महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक )1979च्या कलम (3)अन्वये कारवाई करावी अशी मागणी लेखी तक्रारी अर्जाद्वारे केली आहे कारण कि कोरोना काळात दहिवडी बाजार पेठेसह संपूर्ण माण तालुक्याला पूर्णपणे आर्थिक संकटाला सामोरे जायला लागले परंतु माण तालुक्यातील व्यापारी वर्ग आणि सर्व सामान्य जनता न डगमगता पुन्हा नव्याने जगण्याचा मार्ग शोधात हार मानली नाही असे असताना पंचायत समिती माण चे बिडीओ मात्र मी पणाच्या आवर भावात "खोटं बोल नाऱ्या पण रेटून बोल"अशी आर्दंड भूमिका घेवून लाखोंची शासनाची लुट करणाऱ्या भ्रष्ट प्राथमिक शिक्षकांना पाठीशी घालून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी का नाराज आहेत की स्वतःचा दबदबा कायम ठेवण्या साठी की ग्रामविकास खात्याची प्रतिमा जन माणसात मालिन करावयाची की "महाविकास आघाडी सरकाची" याचाच गंभीर प्रश्न वरिष्ठाना सुद्धा पडलेला असावा अशा अप्रवृतिनां समाजात वेळीच आळा बसला नाही तर ""माण चा बिहार ""होण्यास वेळ लागणार नाही याचा विचार दहिवडी सह माण तालुक्यातील जनतेने केला पाहिजे.माण तालुक्यातील जनतेची अवस्था माण पंचायत समिती मधील अधिकारी "सुस्त आणि मस्त"माणदेशी नागरिक मात्र खरंच आहे त्रस्त!!