🚨 नागरिकांना महत्त्वाचे आवाहन 🚨आपल्या हरकती वेळेवर नोंद कराव्यात.
घरपट्टी नोटीसबाबत जनजागृती
ज्या नागरिकांना घरपट्टीची नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी कृपया लक्ष द्यावे.
📌 नोटीस प्राप्त झाल्यापासून आक्षेप नोंदविण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे.
📌 हा कालावधी नियमाप्रमाणे वाढविता येत नाही.
📌 २१ दिवसांच्या आत हरकत नोंदविली नाही, तर संबंधित घरपट्टी नागरिकांना मान्य असल्याचे गृहीत धरले जाईल.
📌 त्यानंतर अंतिम नोटीस बजावण्यात येईल व दंड आकारणीची प्रक्रिया सुरू होईल.
म्हणून सर्व नागरिकांनी आपल्या घरपट्टी नोटीसची पडताळणी करून आवश्यक असल्यास विहित मुदतीत हरकत नोंदवावी.
🙏 मा. गजानन मगदूम
उपमहापौर सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका.