प्रति,
मा आयुक्तसो ,
सा मि कु महानगरपालिका..
विषय :- मनपा क्षेत्रातील उद्याने पहाटे पाच ते नऊ वाजेपर्यन्त सुरू ठेवणे बाबत...
महोदय,
कोविड मुळे राज्य सरकारने काही निर्बध लावलेले आहेत त्या मध्ये मनपा क्षेत्रातील उद्याने बंद करण्यात आली आहेत.
सांगली शहरातील आमराई आणि महावीर उद्यान सुद्धा बंद करण्यात आली आहेत.त्यामुळे पहाटे पासून फिरायला व योगा, प्राणायम साठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे.
तरी मनपा क्षेत्रातील उद्याने पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यन्त सुरू ठेवण्यात यावीत अशी विनंती आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच,सांगली जिल्हा.