नांदेड :- अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 50 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबवीली जाते.
ही योजना जिल्हास्तर तसेच तालुकास्तरावरती राबविण्यात येत असून जे महाविद्यालय महानगरपालिकेपासून पाच किलोमीटरच्या आतमध्ये व नगरपालिका नगरपरिषद व नगरपंचायत तसेच तालुक्याच्या हद्दीत असलेले महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात अर्ज करण्यासाठी नियमांनमध्ये समाज कल्याण विभागाने महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
नव्या नियमानुसार स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या अनुषंगााने शासकीय वसतिगृहास प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी पात्र ठरणार आहेत अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिली आहे.
समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी शासकीय वसतिगृह प्रवेशाच्या ऑनलाईन पोर्टलवर https://hmas.mahait.org या संकेत स्थळावर अर्ज नोंदविणे आवश्यक आहे. तेंव्हा सदरील अर्ज सादर करण्याकरिता शालेय अभ्यासक्रमासाठी दिनांक 30 जून, 2026 व 11 वी नंतर बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दि. 15 जुलै,2026 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे.
तसेच गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहास प्रवेश न मिळाल्यास स्वाधार योजनेचा अर्ज सादर करता येईल. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत त्यांना वसतिगृह व स्वाधार या दोन्ही योजनाचा लाभ मिळणार नसल्याचे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे. (टिप:- ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतीगृह उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण नांदेड यांच्या वतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षाकरिता विहित वेळेत वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस अर्ज करण्याबाबतचे आवाहन केले आहे. जेणे करुन भविष्यात स्वाधार योजनेचा लाभ घेताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही.