कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राच्या मागे असलेल्या सुभाष नगर भागात मुख्य रस्त्यावर गेले तीन महिने लिकेज साठी खड्डा काढलेला आहे. आज अखेर वारंवार सांगूनही त्या खड्ड्यातील लिकेज काढलेले नाही व त्यामुळे खड्डा मुजविलेला नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावर येजा करणाऱ्या वाहनासाठी व प्रवाशासाठी हा खड्डा म्हणजे मृत्यूचा सापळाच बनलेला आहे. लिकेज काढले नसल्याने भर उन्हाळ्यामध्ये पाण्याची नासाडी होत आहे याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मुळातच महापालिकेचे प्रशासन व कारभारी सुभाषनगर भागाकडे पहिल्यापासूनच दुर्लक्ष करत आहेत. तरी सुभाषनगरच्या या मुख्य रस्त्यावरील लिकेज काढून तो खड्डा त्वरित मुजविण्यात यावा ही विनंती.
तसेच सुभाषनगरच्या या मुख्य रस्त्यालगत गॅस पाईपलाईन साठी देखील खड्डे खोदलेले आहेत तेही त्वरित मुजविण्यात यावेत व तशी व्यवस्था करावी ही विनंती.