भाजपा सांगली शहर जिल्हा वतीने "१४ ऑगस्ट फाळणी दिवस " विभाजन विभीषिका स्मृतिदिन म्हणून "मूक मोर्चा" आयोजन करण्यात आले . यावेळी १४ ऑगस्ट रोजी देशाची फाळणी करून भारत वासीयांना दिलेली जखम व झालेल्या अत्याचार याचे स्मरण करून "एक भारत श्रेष्ठ भारत " याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत अखंड भारत एक राहावा म्हणून मूक मोर्चाच्या माध्यमातून जनजागृती फेरी काढली याप्रसंगी माजी आमदार नितीनराजे शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, नीताताई केळकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, सरचिटणीस केदार खाडिलकर, अविनाश मोहिते, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, डॉ भालचंद्र साठे आदी मान्यवर नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते..